13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्त्व रद्द; जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा मोठा दणका

सरपंचांसह सदस्यांना मोठा दणका

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांका पासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. परिणामी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.

कारवाई झालेल्या सरपंचांची (Sarpanch) नावे
ज्या सरपंचांचे (Sarpanch) सदस्यत्व रद्द झाले आहे, त्यात घागरवाडाचे (Ghagarwada) गोपाळ मारोती वेताळ (Gopal Maruti Vetal), पांगरीचे (Pangri) सुनीता कालीदास डोरले (Sunita Kalidas Dorle), कोळपिंपरीचे (Kolpimpari) अशोक अर्जुनराव यादव (Ashok Arjunrao Yadav), मैंदवाडीचे (Maindwadi) आकाश बंडू मस्के (Akash Bandu Maske), गांजपूरचे (Ganjpur) कस्तुरबाई साला पवार (Kasturbai Sala Pawar), खरात आडगाव (Kharat Adgaon) येथील अनुसया मधुकर आढाव (Anusuya Madhukar Adhav), नागडगाव (Nagadgaon) येथील अशा काही नावांचा समावेश आहे.

error: Content is protected !!