संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र आज या कोरोनाच्या संकटात सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते वादग्रस्त विधाने करून आपल्या आणि पक्षाच्या अडचणी वाढण्याचे काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गोमूत्र पिल्याने कोरोना दूर पळून जातो असे विधान भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी केले होते. या त्यांच्या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली.