आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही’, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. भारतीय जनता पार्टीचा जो उन्माद आणि माज होता तो या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलीत करण्याचं काम करत आहेत.
हे वाचा : पंतप्रधान मोदींनीच दिलं उत्तर, Corona लस कधी आणि सर्वात आधी कोणाला मिळणार?
मुश्रीफ सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर आपलं मत मांडलं.’महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला’, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
‘भाजपने गेल्या वर्षभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत प्रकरण असेल किंवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून आपल्या विचारांचे जे लोक नाहीत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं’, असा आरोप त्यांनी केला.
‘कोरोना बाधितांचे आकडे जरी कमी झाले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना चाचण्या कमी झाल्या, असा आरोप करायचे. मृत्यू कमी झाले तर म्हणायचे मृत्यू दडवले. हा गेल्या एका वर्षातला थयथयाट पाहून लोकं कंटाळली होती. या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं’, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.
‘कोरोना संकटात राज्याचं आर्थिक स्त्रोत बंद झालं. तरी राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेतन दिलं, याची पोचपावती लोकांनी दिली’, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं