ओबीसी नेते नागपुरात आरक्षण आंदोलनावर

ओबीसी समाजाची बैठक झाली असून शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच, पुढील काळात गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याची भूमिकाही तायवाडे यांनी स्पष्ट केली आहे. तर, प्रत्येक जिल्हात जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवू नये ही आमची सरकारकडे मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे आम्ही स्वागत करतो. जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावात सरकारने कुठलही निर्णय घेऊ नये, यावर लक्ष ठेवले जाईल असेही तायवाडेंनी म्हटले.

error: Content is protected !!