गृहमंत्रिद कुणाला मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!

गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मीतहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर दिलं. 

दरम्यान, राज्यात आता सरकारची स्थापना झाल्यानंतर कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील आमदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे तसेच कोणत्या नेत्याची वर्णी मंत्रिपदी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

error: Content is protected !!