आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही. एक अॅब्युलन्स दिली गेली नाही. याची नाराजी माझ्या मनात असल्याची भावना मंत्री महोदयांसमोर सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली.
सातारा: (satara news) सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे माहीत नाही. मात्र तो भाग्यवान माणूस आहे हेसुद्धा माहीत नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. मात्र पालकमंत्री यांनी साधा एक फोन केला नाही. आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही. एक अॅब्युलन्स दिली गेली नाही. याची नाराजी माझ्या मनात असल्याची भावना मंत्री महोदयांसमोर सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवली.
राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ता भांग प्यायल्यासारखी अंगात आली की, माणूस डुलायला आणि नाचायला लागतो. अशा जहरी शब्दात सदाभाऊ खोत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. ज्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. कारण सदाभाऊ खोत हे भाजपचे (BJP) समर्थक आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) निकटवर्तीय समजले जातात. अशावेळी त्यांनी अशा प्रकारची टीका केल्यानं सत्तेत असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत धुसफूस असल्याचं समोर येत आहे.
सदाभाऊ खोत यांनी नेमकी काय टीका केली
शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र, पालकमंत्री यांनी साधा एक फोन केला नाही. ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही, ना एक रुग्णवाहिका दिली.. अशी स्पष्ट नाराजी सदाभाऊ खोत यांनी भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यासमोर बोलून दाखवली.
सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा पलटवार
पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. सदाभाऊच भांग पित असतील. यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. असा टोला शंभुराज देसाई यांनी लागवला. आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती. सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते, असं सुद्धा शंभुराज देसाई यांनी सांगितलंय.
सदाभाऊ खोत आणि शंभूराज देसाई यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. सत्ता मिळाल्यावर काही लोकं डुलायला आणि नाचायला लागतात. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी त्यांना प्रत्युतर दिलंय. त्यामुळे आता आणखी हा वाद किती वाढतो ते बघावं लागेल.