LIC IPO सरकारची विशेष तरतूद;पॉलिसी असेल तर स्वस्तात मिळतील शेअर, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी या आठवड्यात बाजार नियामक सेबीकडे आपल्या आयपीओसाठी मसुदा सादर करण्याची शक्यता आहे. जर तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल, तर तुम्हाला कंपनीचे शेअर्स स्वस्तात मिळू शकतात.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) चे सचिव तुहिन कांत पांडे यांच्या मते, सरकारने एलआयसी कायद्यांतर्गत अशी तरतूद केली आहे की, या आयपीओमध्ये, पॉलिसीधारकांना सवलतीत १० टक्के समभाग दिले जाऊ शकतात. एलआयसीचे देशात कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत आणि या आयपीओमध्ये त्यांना स्वस्तात शेअर्स मिळण्याची मोठी संधी आहे. एवढेच नाही, तर कर्मचाऱ्यांसाठीही एक भाग राखीव ठेवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा:-

पॉलिसीधारकांचे पत्र
सर्व गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. एलआयसीमधील किमान पाच टक्के हिस्सा सरकार विकणार आहे. सरकारला यामध्ये सर्वसामान्यांच्या सहभागाला प्रोत्साहन द्यायचे आहे आणि त्यामुळेच छोट्या गुंतवणूकदारांना स्वस्तात शेअर्स देण्याची तयारी सुरू आहे. पॉलिसीधारकांना या आयपीओमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. लवकरच सरकार या अटी जाहीर करणार आहे.

एलआयसीने पत्राद्वारे आपल्या पॉलिसीधारकांना आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. कंपनीने त्यांना आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) अपडेट करण्यास सांगितले. तुमच्याकडे वैध डीमॅट खाते असेल, तरच देशातील कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होणे शक्य आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना जाहिरातीद्वारे पॅन अपडेट करण्यासाठी देखील सूचित करत आहे.

सरकारला किती पैसे मिळतील?
पांडे म्हणतात की, एलआयसीमधील किमान पाच टक्के स्टेक आयपीओद्वारे विकला जाईल. सरकार किती भागभांडवल विकणार आहे, याचा उल्लेख शेअर विक्रीच्या कागदपत्रांमध्ये केला जाईल. सरकारचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने या आर्थिक वर्षासाठी १.७५ लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले होते, ते आता ७८ हजार कोटींवर आणले आहे.

पांडे पुढे म्हणाले की, एलआयसीच्या आयपीओमधून सरकारला किमान ६०,००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एअर इंडियाच्या विक्रीतून आणि इतर सरकारी कंपन्यांमधील भागविक्रीतून १२,००० कोटी रुपये कमावले आहेत.

error: Content is protected !!