भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, आज विश्वचषकात रंगणार थरारक सामना

भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या थरार आज क्रिकेट विश्वाला अनुभवता येणार आहे. आतापर्यत या युवा विश्वचषकात भारताला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

U-19 World Cup 2022 : भारताने युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषकात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी आयर्लंडवरही मात केली होती. संघातील कर्णधार यश धुलसह सहा जणांना करोना झाल्यावरही भारतीय संघ मैदानात उतरला होता आणि तो सामनाही त्यांनी जिंकला होता. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ग्रुप स्टेज सामन्यांचा आज शेवटचा दिवस आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बाद फेरीच्या लढती होणार हेत. भारत (India U19), पाकिस्तान (Pakistan U19) संघ आधीच बाद फेरीत पोहोचले आहेत. अशा स्थितीत आजचा सामना त्यांच्यासाठी सराव सामन्यासारखा असेल. भारत आणि पाकिस्तानशिवाय बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे आणखी दोन आशियाई संघही आज मैदानात उतरणार आहेत.

बांगलादेश स्पर्धेच्या अ गटात आहे, जिथे त्यांचा सामना यूएईशी होणार आहे. चांगल्या धावगतीच्या (रनरेट) आधारावर बांगलादेश सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते बाद फेरीत जाण्याची खात्री आहे, पण आज यूएईने उलटफेर केल्यास पुढचा प्रवास अवघड होऊ शकतो. क गटात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याबाबतही अशीच स्थिती आहे. झिम्बाब्वे सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण आज अफगाणिस्तानने त्यांना हरवले, तर उपांत्यपूर्व फेरीत जाणे अवघड होईल.

पाकिस्तान विरुद्ध पीएनजी
क गटात पाकिस्तानला त्यांचा सर्वात कमकुवत प्रतिस्पर्धी पापुआ न्यू गिनीविरुद्ध सामना खेळायचा आहे. पाकिस्तानच्या संघाने गेल्या दोन सामन्यात विजय मिळवले आहेत. तर पापुआ न्यू गिनीला दोन्हीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

भारत विरुद्ध युगांडा
ब गटात टीम इंडियाचा सामना युगांडाविरुद्ध होणार आहे. संघावर कोरोनाचे सावट आहे. ५ खेळाडू कोरोनामुळे खेळू शकणार नाहीत. असे असूनही त्याचा संघाच्या विजयावर फारसा परिणाम होणार नाही. कारण युगांडाने मागील दोन्ही सामने गमावले आहेत. भारताचा युगांडाशी आतापर्यंतचा हा पहिला सामना असेल. आतापप्यंत भारताच्या संघाने या विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे.

error: Content is protected !!