मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. कंगनानं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यातून तिने राज्य सरकारचा उल्लेख फॅसिस्ट सरकार असा केला आहे.