नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीन तणावासंबंधी सरकारची भूमिका आज राज्यसभेत मांडली. पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत संघर्ष टाळण्याचा हरएक प्रयत्न करत आहे. या वादावर चर्चेतूनच तोडगा काढायला हवा, हे भारताचं ठाम मत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या वरीष्ठ सभागृहात म्हटलंय. सोबतच, चीनकडून दोन्ही देशांदरम्यान झालेल्या १९९३ आणि १९९६ साली झालेल्या करारांचं उल्लंघन झाल्याचंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.