नवी दिल्ली: मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या योजनेतील घोटाळा समोर आला आहे. पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनातील हा घोटाळा समोर आला आहे. जे लोक यासाठी पात्र नव्हते त्यांनी याचा लाभ घेतल्याचे वृत्त आहे.इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेत (PM Kisan Saman Nidhi Yojana) ११० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी चौकशीत ११० कोटींपेक्षा अधिक रुपये ऑनलाइन माध्यमातून काढण्यात आले आहेत. घोटाळ्याचा हा प्रकार तामिळनाडू राज्यात झाला आहे.
देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन पैसे जमा करण्याच्या योजनेत एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेत ११० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा समोर आला आहे.
शेतकऱ्यांच्या लाभासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून ११० कोटी रुपये पात्र नसलेल्या लोकांना मिळाले आहेत. या प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य सचिव गगनदीप सिंह बेदी यांना ऑगस्ट महिन्यात प्रथमच या योजनेत अचानकपणे लाभार्थिंची संख्या वाढल्याचे दिसले. हा प्रकार १३ जिल्ह्यात झाला. बेदींनी दिलेल्या माहितीनुसार ज्या १८ जणांना अटक करण्यात आली आहे ते सर्व एजेंट आहेत. या योजनेशी संबंधित ८० अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अन्य ३४ अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे त्यांनी सांगितले.कृषी विभागातील अधिकारी ऑनलाइन अर्ज पद्धतीचा वापर करून बनावट नावे लाभार्थी म्हणून जोडत होते. यात सरकारी अधिकारी देखील सहभागी होते. जे नवे लाभार्थी होते ते एजेंटना लॉगइन आणि पासवर्ड देत आणि २ हजार रुपये मिळवून देत असत.
सरकारने या घोटाळ्यातील ११० कोटी पैकी ३२ कोटी रुपयांची वसूली गेली आहे. तामिळनाडू सरकारने दावा केला आहे की शिल्लक रक्कम पुढील ४० दिवसात मिळवली जाईल.