बीड दि.29 (प्रतिनिधी):
मस्साजोग येथील स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपीचे मृतदेह सापडल्याची अंजली दमानिया यांनीजाहीर केलेल्या बातमीत तथ्य नसल्याचा खुलासा बीड जिल्हा पोलीसांनी केला आहे.
या संदर्भात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच कै.संतोष देशमुख यांचे हत्ता प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमाणीया यांना त्यांचे भ्रमणध्वरीवर ‘व्हाईस मेसेस’मध्ये बश्वेश्वर कल्याण येथे तीन डेथ बॉडया सापडल्या आहेत, ती खात्रीलयक माहिती नाही, आपण ओपन नाही करायच, अशा मजकुराची व्हाईज मेसेसची बीड पोलीस दलाने खात्री केली असता, असा काहीएक प्रकार घडलेला नसुन, ज्या इसमाने श्रीमती अंजली दमाणिया यांना व्हाईस मेसेज पाठविला त्याने मद्यार्काचे नशेमध्ये असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलीसांशी संपर्क करावा, आरोपीचे शोध कार्यास अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती कॉमेंट किंवा व्यतव्य करु नये. काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलीसांना कळवुन तपास कार्यास सहकार्य करावे. असे बीड पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना अवाहन करण्यात आले आहे.