धमकीच्या फोनची चौकशी झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : धमकीच्या फोनबाबत (Threatening phone call) नीट चौकशी झाली पाहिजे. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी म्हटलं आहे.

हे वाचा : IPL २०२० च्या सामन्यांचा shedule जाहीर पहा पूर्ण shedule

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakre) यांचं मातोश्री (Matoshree) निवासस्थान उडवून देण्याची धमकी दाऊद इब्राहिमच्या (Daud Ibrahim) हस्तकानं केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!